Breaking
जळगाव

शिवपानंद शेतरस्त्यांसाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ११ ऑक्टोबरला पेरू वाटप आंदोलन.

0 7 5 9 9 1

(उपसंपादक – कल्पेश महाले)

जळगाव:- महाराष्ट्रातील शेतरस्त्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असुन दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपच्या घटना वाढत चालल्या असुन भावा-भावात, शेतकऱ्यांमध्ये आप-आपसात मोठे वाद निर्माण झाले असुन भविष्यात निर्माण होणार अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिवपानंद शेतरस्ता चळवळ उभी केली असुन शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळून देवुन शेवटच्या शेतकर्‍याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट् राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे संस्थापक शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले-पाटील यांनी सांगितले.

खालील प्रमाणे मागण्या आहेत.

1) जिल्हयात शिवपानंद शेतरस्त्यांच्या नंबरींचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू करा.

2) जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत.

3) समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा.

4) चालू वहीवाटीच्या प्रत्येक शेतरस्त्याचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत.

5) शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा.

6) नकाशावरील शेतरस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा.

7) शेरस्त्याअभावी नापिक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्यावी.

8) प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा.

9) शिवपानंद शेतरस्त्यांच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतस्ते करा.

10)मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने ११/१०/२०२४ रोजी जळगाव जिल्हाधिकार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीने पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल.

शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने मागणीवजा आंदोलनाचा ईशारा दिला असून शेतीची वाढत चालली तुकडेवारी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरता व पेरणी अंतर्मशागत कापणी मळणी या स्वरूपाची यंत्रसामग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेती पुरक व्यवसाय सर्पदंश विज पडणे पुर येणे आग लागणे यास्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना,शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारामाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनात आणत वेळोवेळी निवेदने आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेतरस्त्यांच्या प्रश्नासाठी, शेत तिथे रस्ता व तहसीलवर शुन्य शेतरस्ता केस ठेवाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.११/१०/२०२४ रोजी शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल याची प्रशासणाने गांभिर्याने दखल घ्यावी यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.

वरील निवेदनावर जिल्हा शिवपानंद शेत रस्ता चळवळ  समिती चे शरद पवळे, दादासाहेब जंगले, गणेश बाविस्कर, प्रताप धात्रक, प्रकाश दौंड, विकास पवार, पोपट पवार,   मुकेश जाधव, विठोबा माळी, विजय माळी, रामचंद्र  आव्हाड आदींच्या सह्या आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 9 9 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे