Breaking
जळगावधुळेमहाराष्ट्रराजकिय

समुद्री किनारी वसणाऱ्या बांगलादेशींचा बंदोबस्त करणार, सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची: पदभार स्वीकारताच नितेश राणेंचा इशारा.

0 7 5 7 0 7

उपसंपादक – कल्पेश महाले 

मुंबई – भाजप नेते आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. नीतेश राणे यांनी आज आपल्या पदभार स्वीकारला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. 26/11 नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्यातीतील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपरोक्त इशारा दिला आहे. समुद्र किनारी रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले नीतेश राणे?

मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.

त्यांचे वास्तव्य सहन करणार नाही.

नीतेश राणे यांनी पुढे बोलताना, रोहींग्यो आणि बांगलादेशींना इशारा दिला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या एक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात, असा दावा नीतेश राणे यांनी केला. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले. रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 5 7 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे